बालसंस्कार परिपाठच्या "पाणी विशेषांक" मध्ये प्रसिद्ध झालेला लेख. दि २२ सप्टेंबर २०२३. *पाणी अडवा - पाणी जिरवा* ----------------------------------- *पानी रे पानी, तेरा रंग कैसा?* *भूखे की 'भूख और प्यास' जैसा !* "शोर" चित्रपटातलं हे गाणं पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणारं आहे... खरं तर, *पाण्याला रंग नाही, पण पाण्यामुळेच जीवनात 'रंग' आहेत !* *पाण्याला वास नाही, पण पाण्यामुळेच पृथ्वीतलावर सजीवांचा रहि'वास' आहे !!* *पाण्याला गंध नाही, पण पाण्यामुळेच सृष्टीत सु'गंध' आहे !!!* अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यातही वस्त्राशिवाय आपण जगू शकतो, निवाऱ्याशिवायही काही काळ जिवंत राहू शकतो पण अन्न, पाण्याशिवाय आपण एक आठवड्यापेक्षा जास्त काळ जगू शकत नाही... *पाण्यामुळेच अस्तित्व आहे,* *पाण्यामुळेच स्पंदन आहे !* *पाणीच पृथ्वीवरील अमृत,* *पाण्यामुळेच जीवन आहे !!* शायर श्याम सुंदर अग्रवाल एका ठिकाणी लिहितात.. *सदा हमें समझाए नानी,* *नहीं व्यर्थ बहाओ पानी !* *हुआ समाप्त अगर धरा ...